Posts

मैत्रीला कोणतीच परिभाषा नाही आणि परिसीमा ही नसते. अनोळखी कुणी कधी इतके जवळचे होऊन जाते की कळतही नाही
परके झाले ते क्षण.. निसटून गेली ती वेळ जी कधी तुझा मिठीत गेली होती, हसते आता रात्र मला जी कधी तुझा सहवासाने धुंद झाली होती
रोज संध्याकाळी घरातून दिशाहीन निघतो समुद्रकिनारी निरर्थ येऊन बसतो पायाचा अंगठा हि मखमली वाळूत , नकळत तुझंच नाव कोरतो पण थबकणारी प्रत्येक लाट ते पुसत हाच प्रश्न विचारते तुला प्रेमात वेडं करून जी निघून गेली , तिच्याचसाठी का तू हे अश्रू ढाळतो
वेड्या’ सारखा देवाकडे तुलाच रोज मागत होतो माझा वेड्या मनाचा शाप आता तुला लागणार नाही कारण आता रोज उठून देवाकडे तुला मागणार नाही राहून राहून मरताना मात्र तुझाच नावाचे हुंदके येतील तू एकदा तरी माझासाठी परत येशील याच खोट्या आशेवर या ‘वेडयाचे’ प्राण जातील.
तुला पाहता शब्द हवेत विरून जावे असं का ग व्हावे मी माझे न राहावे तू चालता वाऱ्याची झुळूक जणू यावी मी ही त्याच संगे का दरवळत जावे स्पर्श तुझा जणू मोरपिसाचा भास हा अन तू समोर येता का भरून जातो श्वास हा एकाच इच्छा, तुला कोणाचीही कधी नजर ना लागे जर तुटला कधी श्वास तुझा.. तर जोडीन मी माझा श्वास तुझा श्वासामागे.
या जगाचं जेवढं...आयुष्यमान असेल असं प्रेम कधीच ...जगानं पाहिलं नसेल इतकं कुणी कुणाला ...वेड लावलं नसेल इतकं अलगद काळीज ..कुणी चोरलं नसेल नुसत्या गोड हसण्यानं ..इतकं कुणी फसवलं नसेल खंर प्रेम कळत असूनही ...इतकं कुणी रडवलं नसेल
सांग सख्ये गुलाबासारखी जीवनात येशील कधी काट्याप्रमाणे टोचत राहशील कधी सांग सख्ये साखरेची गोडी पण मधुमेहाची भीती देशील कधी सांग सख्ये दिव्यासारखं जळत राहून माझ्या जीवनात प्रकाश देशील कधी